Saturday, 30 August 2014

बदल

पूर्वीच्या काळी
त्या छोट्याशा घरकुलात
विलक्षण शांती असायची
भरल्या गोकुळासारखे
घर असले तरी
जीवाला एकांत होता
नात्यांचा रेशमीबंध होता
आपुलकी, माया, प्रेम होते
सारे घर आनंदाने भरलेले असायचे
आणि…
आजच्या काळात
आपल्या माणसांशी
नुसते बोलायला थोडीशी सवड मिळाली तर
त्यातच गोड मानून घ्यावे लागते… 

No comments:

Post a Comment