पूर्वीच्या काळी
त्या छोट्याशा घरकुलात
विलक्षण शांती असायची
भरल्या गोकुळासारखे
घर असले तरी
जीवाला एकांत होता
नात्यांचा रेशमीबंध
होता
आपुलकी, माया, प्रेम
होते
सारे घर आनंदाने भरलेले
असायचे
आणि…
आजच्या काळात
आपल्या माणसांशी
नुसते बोलायला थोडीशी
सवड मिळाली तर
त्यातच गोड मानून
घ्यावे लागते…
No comments:
Post a Comment