आठवणींच्या पाकळ्या
गळून पडत नाहीत
टवटवीत कळी होऊन मनात
फुलत राहतात
त्यांचाच आधार घेऊन
पुढे सरकावे तो…
फुले त्यांच्या गंधाने
वेडावून टाकतात
काही क्षण पडदा दूर
सारला जातो
मन आठवणींच्या जाळ्यात
सापडते
भवतालाचा विसर पडतो
प्रितीचे पंख लावून
मन पाखरू उडू लागते
वास्तवाचे भान येताच
मन सावरले जाते
कायमचा पडदा पडत नाही
आठवणींच्या फुलांवर
कळत नाही का?
आठवणी अशा ओढ लावतात…
No comments:
Post a Comment