काय झाले या गावाला?
आकाश तापलेले
कुंद वातावरण
घराची बंद कवाडे
सुकलेले तुळशी वृंदावन
रिकामेच अंगण
सडाही न टाकलेले
रांगोळीची तर बात सोडा
सुन्न पाणवठा, नाही
काकणांची किणकिण
समोर दिसते आहे झाड,
वाळलेल्या काडीसम
गजबजाटही गायब, कुठे
गेली छोटी मंडळी?
भिंतीला टेकून बडबडगीते
म्हणणारी
आणि आजीच्या गोष्टी
ऐकणारी
घरे होऊ लागली निर्मनुष्य
सोनियाच्या उंब-यावर
आता
कुणी कुणाची वाट पाहत
नाही
दाराआडून डोकावणा-या
वहिनीसाहेब
डोईवर पदर घेतलेल्या,
गेल्या कुठे?
काय झाले या गावाला?
नुसता ओस पडू लागला
आहे…
चालत आहेत शहराची वाट
आटून गेलंय पाटाचं
पाणी
आम्रतरूवर कुहू कुहू
गाणारी कोकीळा
ती ही कुठे उडून गेली
कुणास ठाऊक?
काय झाले या गावाला?
अरे!
रे!
गाववाल्यांना
आता सिटीच वाटू लागली आहे,
त्यांचे
टुमदार व्हिलेज…

No comments:
Post a Comment