Sunday, 31 August 2014

कधी कधी

कधी कधी वाटते
कविता नसावी
नुसतेच भावनेचे भारलेपण
तर तिने मांडायला हवेत
जळजळीत प्रश्न
तिने थैमान घालावे
विद्रोहाचे...
सगळ्या कविकल्पनांवर
नाहीतर पेटवावी
एक अखंड ज्योत
समाजाच्या हितासाठी...


No comments:

Post a Comment