Tuesday, 30 June 2020

जशी ‘पंढरीची वारी’


जशी पंढरीची वारी



एक विलक्षण काहीसं
ज्याची सतत ओढ असते...
त्याविषयी काही समजलेलं नसतं!
तरी त्याला
भेटावसं,
भिडावसं,
मिळवावसं वाटतं!
कधी मध्येच,
हरल्यासारखं,
चुकल्यासारखं वाटतं!
तरीही मन
विश्वासाचा एक धागा,
घट्ट पकडून ठेवतं!
अनुभवलेल्या असंख्य क्षणांतून
प्रेरणेच्या कळ्या वेचतं!


हे विलक्षण म्हणजे काय?
हे शोधणं, जाणून घेणं सुरुच राहिल...
जशी पंढरीची वारी
दिस मोगरा नि चित्त एकरुप
ध्येयापाशी...

Sunday, 19 April 2020

मुस्कुराते रहेंगे

एक दुसरे से दूर है हम
फिर भी दुरीयाँ नही है।
एक दुसरे के बिना जिने की
मजबुरी है,
लेकिन हम मजबूर नहीं।


देखो, आसमान में कितने तारें
रहते हैं बिखरे-बिखरे,
फिर भी उनके अस्तित्त्व से,
करते है रोशन अंबर को।


सूरज-चंदा कभी न मिलते
पर ये प्रकृति उनसे है।


धरती-गगन में हमेशा जुदाई
बारिश के जरिये प्यार बरसाते हैं...

वैसे ही हम बरसते रहेंगे...
अपने-अपने आकाश में,


बारिश की बुँदों को महसूस करेंगे
हवा के झोकों से बाते किया करेंगे
अपने अटूट रिश्ते का एहसास,
कभी कम न हो।


गाँव की मिट्टी, पेड और पौधें,
पंछियो की टोली, नदीयाँ का पानी
पता है इन्हें, हमारी जुदाई की कहानी


अपना आकाश अलग है।
बरसते रहेंगे...
जहाँ है वहाँ मुस्कुराते रहेंगे...




Sunday, 13 January 2019

दिलासा


अश्रू रोखतात व्यक्त होणं...
शब्द फुटतच नाहीत,
खूपदा घडतं हल्ली असं, 
व्यक्त होताना...
अश्रू पापणीच्या पहाऱ्यातून निसटले की
त्याचे अर्थ बदलत राहतात
कुणासमोर रडलो त्याप्रमाणे
अलीकडे हे वारंवार घडतं...
बोलताना आसवं दाटणं,
हेही व्यक्त होण्यातलं संवादी रुप
माझ्याबाबतीत दुबळं ठरतंय
...शोधतेय तो दिलासा
तो धीर,
तो हात,
जो पापण्यात दाटलेल्या मेघांचे
स्वतःच्या समजुतीप्रमाणे अर्थ लावणार नाही
न बोलताच, त्याच्या घट्ट मिठीने
तो हात मला सावरत डोक्यावरून फिरेल...  




Sunday, 22 April 2018

पुस्तक व्हा...

पुस्तकांनो,
तुमच्याविषयी काय बोलू?
माझी मलाच नव्याने ओळख,
तुम्ही करून दिलीत…
सगळं संपलं... असं वाटलं तेव्हा
माझा हात घट्ट धरून ठेवलात
एक काळ असा होता,
सोबतीला कोणी नव्हतं
साथ दिलीत तुम्ही
अगदी माझ्याही नकळत


लंपन, सावित्री, रमा-माधव, शर्मिष्ठा,
शितू, मीरा, बकुळा...
यांच्या रुपाने आपल्या माणसांची
उणीव भरून काढलीत...


माझं म्हणणं मांडताना,
वाणी अबोल, रडवेली झाली तेव्हा
लेखनाचा मोगरा हाती दिलात
त्याचा सुगंध पसरवण्यासाठीची
शक्तीही तुमचीच


तुम्हाला कसं समजतं सगळं
माझ्या मनातलं...
चेहऱ्यावर हास्य देत
इतरांनाही आनंद वाट
तुम्हीच सुचवता
तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळेच
माझ्या आयुष्यात सुखाचा झरा
पुन्हा खळाळत वाहू लागलाय
बागडण्यासाठी स्वप्नांचे
पंखही लाभलेत


खरंच, पुस्तक उघडलं नी जादू झाली
त्यात दिसलं निरागस गाव
मूलमंत्र तयाचा
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...
पुस्तकी नको, पुस्तक व्हा...


Wednesday, 28 February 2018

होळी



सोहळा रंग-सुगंधाचा
वसंतोत्सवाच्या चाहुलीचा
नव्या रुपाच्या जाणिवेचा
सृष्टीच्या सृजनाचा
नव्या उत्साहाचा
एकोप्यानं नांदत्या घराचा
आग्रह पुरणा-वरणाचा
पालवीसारखा हा कोमल क्षण
आज होळीचा सण ।।१।।



भूतकाळाचं सगळं ओझं
दडपण
ताण
थकवा
चिडचिड
चिंता
भीती
राग
नष्ट व्हावा यावेळी,
प्रत्येकाच्या आयुष्यात यावी
होळी मनमोकळी... ।।२।।

Monday, 12 February 2018

वक्त से पहले



कहते है,
मन के घाव
वक्त भर देता है।
क्या वो वक्त मुझे नसीब होगा?
मेरे लिए वक्त हमेशा 
किरनों की रोशनी की तरह है,
जो सिर्फ नजर आता है।
महसूस होता है।
उम्मीद का सवेरा लाता है।
बस्स और कुछ नही,
मेरी कहानी वही की वही थमी है...
शायद इसी वजह से
कोशिश यही रहती,
वक्त आने से पहले वक्त के बारें में सोचू
उसके आनेसे पहले अपनी पहल करू
लोग कहते चंचल, मूडी
उन्हे क्या पता
दिवारों से बाते करना
सब कुछ पास होकर भी
अपनेपन के एहसास को तरसना
ये प्यार शब्द जैसे मेरे लिए है ही नही


.... मेरे वक्त घडी में
वो रेत ही नही है।
खुद जो रेत बन गयी हूँ...
जिसपर धूप छाँव का कोई असर नही होता...
काश इस रेगिस्तान में
पानी ना सही
मन के व्दार तो खुले...

Thursday, 23 June 2016

सौंदर्यशास्त्र

कवीला विचारू नये,
तू कधी प्रेमात पडलास का?
त्याचं उत्तर त्याच्याकडे नसेल
तो फक्त किंचीत हसेल...
तुम्हाला जी प्रेमाची व्याख्या वाटते,
त्या चौकटीत
कवी, लेखकाला बसवू नका...
त्याचं आणि तुमचं प्रेमाचं जग
फार वेगळं आहे...
त्याने Negative लिहिलं;
तर त्याचा प्रेमभंग झालाय...
त्याने Positive लिहिलं;
तर तो प्रेमात पडलाय...
अशी विधानं करून,
स्वतःलाच फसवू नये...
‘अनुभवातून तो लिहितोय’
असं म्हणालात तर एक वेळ ठीक आहे
पण त्याने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ
त्याच्या खाजगी आयुष्यात शोधू नका...
कितीतरी कवींच्या लेखनाची अवहेलना
याचमुळे झालीय...
‘फार वाईट वाटतं...’

एक साधा सरळ प्रश्न आहे,
अनुभवांचं मौलिक संचित
सगळ्यांकडेच असतं...
मग सर्वसामान्य माणसालासुध्दा
कवीसारखं (लेखकासारखं) लिहावसं का वाटत नाही?
उत्तर सोपं आहे...
त्या अनुभवाच्या मौलिक संचिताकडे पाहण्याचा
नवा दृष्टिकोन त्याच्याकडे आहे...
ज्यामुळे त्याला सतत नवनिर्मितीची ओढ लागलेली असते
म्हणूनच कवीच्या प्रेमाची अनुभूती आणि असीम प्रेमाला
बंदिस्त करू नका...
त्याने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ शोधताना
सतत ‘शिक्के’ मारत राहू नका
आणि ‘ism’ मध्ये तर अजिबात कोंडू नका...
‘कलाकृतीचा आस्वाद’ घेणं
जितकं साधं सोपं, तितकच कठीण...
त्यासाठी एकच गोष्ट करायला हवी
‘सौंदर्यशास्त्र’ नावाच्या शाळेत नावनोंदणी
मग बघा, कलावंत आणि लेखकांशी
तुमची कशी छान गट्टी जमेल...!!!!!